बार्शीटाकळी येथे शेतकरी विकास मंच शाखा स्थापन
बार्शीटाकळी येथे शेतकरी विकास मंच शाखा स्थापन
बार्शीटाकळी:
शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या शेतकरी विकास मंच शाखेची बार्शीटाकळी येथे ,आज दि. १७ जानेवारी २०२४ रोजी शेतकरी विकासमंच शाखा स्थापन झाली.
ह्या नवनिर्मित शाखेच्या अध्यक्षपदी रिजवान खान ,उपाध्यक्षपदी प्रकाश माणिकराव ,डिगांबर जाधव पाटील ,सचिव शरद ढोरे पाटील सहसचिव नदीम उल हक तर बार्शीटाकळी तालुका प्रसिध्दी प्रमुख मुर्तुज़ा बेग व सदस्य म्हणून नासिरोद्दीन सेठ , फरहान खान, फैज़ान खान, नदीम पठाण, फय्याज काझी, शेख जुनेद, मुजीब जागिरदार, मोहम्मद अंनिस, इलयास खान, वसिम खान, लुकमान खान, संतोष खडसे, नासिर खान, तौसिफ खान, मुसब्बिर जावेद, जामनिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रिजवान खान यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश माणिकराव यांनी केले . सूत्रसंचालन मुर्तुजा बेग ( संपादक , साप्ता.विदर्भ की तिसरी आख )सांभाळले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वानी अथक परिश्रम घेतले .
चौकट
शेतकरी विकास मंच व त्यांचे उद्दिष्ट आणि कार्य
शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कार्य करणे .शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय व हक्कांसाठी जागृत करने
कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला वेळेवर हमीभाव मिळावा .
शेतकऱ्यांनी ,शेती करण्यापासून परावृत्त होवु नये म्हणून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येते .
शेतकऱ्यांच्या हितासाठी,शासनाने शेती नीती तयार करावी यासाठी प्रयत्नशील
जाहिरात